शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

काँग्रेस आणि दुष्काळ हातात हात घालून चालतात, मोदींची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 17:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहिल्या इको फ्रेंडली रिफायनरीचं उद्घाटन केलं आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहिल्या इको फ्रेंडली तेल रिफायनरीचं उद्घाटन केलं आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि दुष्काळ हातात हात घालून चालतात, अशी बोचरी टीका नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे. ते राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यातील रिफायनरीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.ते म्हणाले, काँग्रेस प्रकल्पांच्या उद्घाटनाशिवाय काही करत नाही आणि फक्त मोठं मोठं बोलते. रेल्वे बजेटमध्ये काँग्रेसनं 1500हून अधिक घोषणा दिल्यात, त्या सगळ्या हवेतच विरल्या आहेत. वन रँक वन पेन्शनमध्ये काँग्रेसनं जवानांसोबत छळ केला होता. तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनंही बजेटमध्ये फक्त दिखावा केला होता. 2022ला ज्या वेळी लोक 75 वर्षांच्या स्वातंत्र्याचं सेलिब्रेशन करत असतील, त्यावेळीच ही रिफायनरी कार्यान्वित होईल. मोदींनी यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरही स्तुतिसुमने उधळली आहेत. राजस्थान सरकार 40 हजार कोटी रुपये वाचवण्यात यशस्वी झालं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.राजस्थानातील बारमेर जिल्ह्यात असलेल्या पंचपदरा येथे ही तेल रिफायनरी बनवली जात आहे. राजस्थानमधील नागरिकांना हा प्रकल्प सुरू कधी होतो याची उत्कंठा लागून राहिली आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम राजस्थानात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. राजस्थान सरकार आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारणार आहे. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठी गुंतवणूक असलेला प्रकल्प ठरणार आहे. राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यातील रिफायनरीवर जवळपास 43 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चार वर्षांमध्ये ही रिफायनरी तयार होणार असून, बीएस-6 या तंत्रज्ञानावर ती आधारित आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस